मंगळवार, 19 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 28 सप्टेंबर 2022 (11:31 IST)

रस्ता अपघात, बस-ट्रकच्या धडकेत 8 ठार, 20 जखमी

लखीमपूर खेरी येथे भीषण अपघात झाला आहे.बस आणि ट्रकच्या समोरासमोर झालेल्या धडकेत 8 जणांचा मृत्यू झाला आहे तर 20 जण गंभीर जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे.जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, धौरहराहून लखनौला जाणारी बस आणि डीसीएमची लखीमपूर खेरी जिल्ह्यातील इसानगर पोलीस स्टेशन हद्दीतील एरा पुलावर सकाळी 7.30 वाजता समोरासमोर टक्कर झाली.तसेच 8 जणांचा मृत्यू झाला आहे.मृतांचा आकडा वाढू शकतो.20 जण गंभीर जखमी असल्याचं सांगण्यात येत आहे.पोलीस आणि अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत.जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.एक-दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.
 
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लखीमपूर खेरी जिल्ह्यातील रस्ते अपघातावर तीव्र दुःख व्यक्त केले आहे.योगींनी शोकसंतप्त कुटुंबीयांच्या संवेदना व्यक्त केल्या आहेत.योगी यांनी जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर योग्य उपचार करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.तसेच जखमींची प्रकृती लवकर बरी होण्यासाठी प्रार्थना केली.यासोबतच जिल्हादंडाधिकारी आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना घटनास्थळी जाऊन मदतकार्य युद्धपातळीवर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.