शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 29 डिसेंबर 2021 (14:37 IST)

महिलेने 3 महिन्यात 2 मुलांना जन्म दिला

बिहारच्या समस्तीपूर जिल्ह्यातील उजियारपूर पीएचसीमध्ये एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. आशा कार्यकर्त्याच्या संगनमताने एका महिलेने नऊ महिन्यांऐवजी तीन महिने 12 दिवसांच्या कालावधीत दोनदा मुलाला जन्म दिला. दोन्ही वेळा महिलेने मुलाला जन्म दिला आहे. मात्र त्याची माहितीही आरोग्य विभागाला नव्हती. 
दोन्ही वेळा सदर महिलेला उजियारपूर रुग्णालयात दाखल करून बाळंतपण केले. सदर महिला हरपूर रेबाडी गावातील आहे. या फसवणुकीमागे जननी बाल सुरक्षा योजनेचा फायदा असल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणाचा खुलासा झाल्यानंतर, सीएस डॉ. सत्येंद्र कुमार गुप्ता यांनी अतिरिक्त उपअधीक्षक सह सहाय्यक अतिरिक्त मुख्य वैद्यकीय अधिकारी असंसर्गजन्य रोग यांच्या नेतृत्वाखाली एक तपास पथक तयार केले आहे.
माहिती आणि रेकॉर्डनुसार, सदर  28 वर्षीय महिला उजियारपूर ब्लॉकमधील हरपूर रेबाडी गावाची रहिवासी आहे. याच गावातील आशा कार्यकर्ता रीता देवी यांच्या मदतीने तिला 24 जुलै रोजी पहिल्यांदा उजियारपूर पीएचसीमध्ये दाखल करण्यात आले. त्याच दिवशी महिलेने एका मुलालाही जन्म दिला. यानंतर, सदर महिलेला प्रसूतीसाठी 3 नोव्हेंबर रोजी पुन्हा उजियारपूर पीएचसीमध्ये दाखल करण्यात आले आणि 4 नोव्हेंबर रोजी तिने एका मुलाला जन्म दिला. त्यानंतर महिलेला डिस्चार्ज देण्यात आला.
नोव्हेंबरमध्ये उजियारपूर पीएचसीमध्ये संस्थात्मक प्रसूती झाल्यानंतर, जननी बाल सुरक्षा योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना देण्यात येणार्‍या प्रोत्साहन रकमेचा तपशील तयार केला जात होता. यावेळी सदर महिलेची प्रसूतीही 24 जुलै रोजी झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर रुग्णालय प्रशासनाने 31 जुलै रोजी जननी बाल सुरक्षा योजनेंतर्गत दिलेली प्रोत्साहन रक्कमही भरली आहे. आता पुन्हा 4 नोव्हेंबर रोजी प्रसूतीबाबत प्रकरण अडकले. रुग्णालयाचे लेखापाल रितेशकुमार चौधरी यांनी तातडीने पीएचसीचे प्रभारी, रुग्णालय व्यवस्थापक, डीएएम आणि डीपीएम यांना कळवले. तसेच तिचे पेमेंटही थांबवले.
 
डॉ. सत्येंद्र कुमार गुप्ता, सीएस, समस्तीपूर म्हणाले, “उजियारपूर पीएचसीमध्ये तीन महिन्यांच्या अंतराने प्रसूती झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी तपास पथक स्थापन करण्यात आले आहे. तपास पथकाच्या अहवालावरून दोषी कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात आली आहे. पेमेंटसाठी खोटारडेपणा झाल्याचे दिसते.