शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. राष्ट्रीय
Written By वेबदुनिया|
Last Modified: जयपूर , बुधवार, 23 नोव्हेंबर 2011 (14:27 IST)

गुर्जर आरक्षण आंदोलन चिघळणार

गुर्जर आरक्षणप्रश्नी आक्रमक भूमिका घेत गुर्जर नेते किरोरीसिंग बँसला यांनी तीव्र आंदलोन छेडत चलो जयपूरची घोषणा केली आहे. सरकारने जर आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर गुर्जरांचा मोठा मोर्चा जयपूरमध्ये नेण्याची धमकी त्यांनी राज्य सरकारला दिली आहे.

सध्या किरोरीसिंग दौसा या गावात धरणे आंदोलन करत आहेत. आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करत आहोत. आमच्या मागण्या मान्य करण्यासाठी आम्ही सरकारला दोन दिवसांची मुदत दिली आहे.