1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
  4. Spiritual and Scientific benefits of Camphor

आरतीत कापूर का लावतात? जाणून घ्या वैज्ञानिक कारण

धार्मिक कारण
शास्त्रानुसार कापूर लावल्याने अक्षय पुण्याची प्राप्ती होते. ज्या घरात नियमितपणे कापूर जाळला जातो, तेथे पितृदोष किंवा इतर प्रकारच्या दोषाचा प्रभाव राहत नाही. 
कापूर लावल्याने वातावरण पवित्र आणि सुगंधित होते. 
ज्या प्रकारे कापूर पूर्णपणे जळून जातं त्याप्रमाणे सर्व अशुद्धी आणि अहंकार सोडून स्वत:ला देवाच्या शरणी समर्पित करावे.
कापराच्या प्रभावाने घरातील वातावरणात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि त्याच्या सुगंधाने आपल्या विचारातही सकारात्मकता येते.
कापराच्या धुराला स्पर्श करून मस्तक आणि डोळ्यांना लावणे म्हणजे देवाला प्रार्थना करणे की आमच्या विचार शुद्ध असावे.
 
वैज्ञानिक महत्त्व
कापराच्या सुगंधाने जिवाणू, विषाणू, लहान कीटक नष्ट होतात. 
कापराच्या सुगंधाने साप आणि जमिनीवर रांगणारे जीव दूर राहतात.
कापरामुळे वातावरण शुद्ध राहतं व आजार दूर राहतात.
पांढरं कापूर एक उत्तम अँटी ऑक्सिडेंटचं काम करतं.
पुढील लेख
गणपतीचे बदलते स्वरूप