गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. बालकथा
Written By
Last Updated : शुक्रवार, 16 एप्रिल 2021 (12:40 IST)

प्रभु श्रीरामाने तालुडीला दिली अनोखी भेट

जेव्हा रावण अपहरण सीतेलं लंकाकडे घेऊन गेला तेव्हा सीतेला वापर आणण्यासाठी श्रीरामांना मोठ्ठ समुद्र पार करायचे होते. पूर्ण वानर सेना आणि इतर प्रजातीचे जीव जंतू समुद्रात पुल तयार करण्यासाठी रामाची मदत करत होते. ज्याने थेट लंकेत प्रवेश करता येईल. श्रीराम पूर्ण वानर सेनेच्या समर्पणामुळे खूप भावुक होते. तेव्हा त्यांनी बघितले की एक लहाशी तालुडी देखील त्या पुल निर्माणासाठी सेनेची मदत करत आहे. ती लहानसा दगड आपल्या तोंडात उचलून मोठ्या-मोठ्या दगडांजवळ ठेवत होती. 
 
त्या तालुडीचं मनोबल तेव्हा तुटले जेव्हा एका वानराने तिची थट्टा करत म्हटले की लहाश्या तालुडीला दगडांपासून लांब राहावे नाहीतर दगडांखाली येऊ शकते. त्या वानराला हसताना बघून इतर पशु-पक्षी देखील हसू लागले आणि तिचा थट्टा करु लागले. चिमुकल्या तालुडीला खूप वाईट वाटले आणि ती रडू लागली. ती रडत-रडत श्रीरामांजवळ पोहचली आणि घडलेलं प्रकरण सांगितलं. 
 
तेव्हा प्रभू श्रीरामांनी सर्वांना एकत्र केले आणि दाखवले की तालुडीने गोळा केलेले दगड कशाप्रकारे एकमेकांना जुळत आहे. त्यांनी म्हटले की एखादे योगदान लहान असो की मोठे, ते महत्त्वाचं नसून सर्वात महत्त्वाचे आहे हेतू आणि समर्पण. 
 
तालुडीची मेहनत आणि लगन बघून श्रीरामांनी तिच्या पाठीवरुन प्रेमाने आपले बोट फिरवले. त्यांनी प्रेमाने स्पर्श केल्यामुळे तालुडीच्या पाठीवर तीन रेषा उभारुन आल्या. असे म्हणतात की या घटनेपूर्वी तालुडीच्या पाठीवर रेषा नसायच्या. 
 
बोध: मोठे असो वा लहान, प्रयत्न करणं महत्त्वाचं आहे.